शेतकऱ्यांना बांबू लागवडी करिता अनुदान देणारी अटल बांबू समृध्दी योजना ( atal bamboo samruddhi scheme ) जाणून घेऊयात काय आहे योजना.

atal bamboo samruddhi scheme

atal bamboo samruddhi scheme

बांबू ( Bamboo ) हे एक बहुउपयोगी वनोपज असून आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे, मानवाच्या लाकूड विषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सहज उपलब्ध होणारे व परवडणारे वनोपज असल्याने बांबूला गरिबांचे लाकूड असे हे म्हटले जाते.

अटल बांबू समृद्धी योजनेत शेतकऱ्यांना उती संवर्धित (टिश्यू कल्चर) बांबू रोपे पुरवठा व देखभालीसाठी अनुदान देण्याचा निर्णय ५ फेब्रुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

पुर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेत शेतकऱ्यांना बांबू रोपे पुरवठा करण्याचा तरतूद होती. या योजनेत सुधारणा होऊन आता शेतकऱ्यांना बांबूच्या देखभालीसाठी देखील अनुदान मिळणार आहे. आता २ हेक्टर करिता बाराशे रोप लागवड व देखभालीसाठी प्रति रोप १७५ रुपये अनुदान तीन वर्षांत देण्यात येईल.

जुन्या योजनेत एक हेक्टरसाठी सहाशे रोपे देण्याची तरतूद होती. शेतकऱ्याला बांबू रोपांच्या बरोबरच निंदनी, पाणी देणे, संरक्षण व खते यासाठी देखील अनुदान मिळणार असल्यामुळे बांबू लागवडीत वाढ होऊन, शेतकऱ्याला लाभ होईल.

बांबू ही अतिशय जलद वाढणारे सदाहरित व दीर्घायुष प्रजाती आहे बांबू लागवडीमुळे ( Bamboo lagwad ) शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळण्याची मोठी क्षमता आहे.

देशात बांबूंची बाजारपेठ Bamboo market सुमारे २६,००० कोटीची असून त्यामध्ये बांबू फर्निचर, बांबू पल्प, बांबू मॅट, बोर्ड कार्टेज, इंडस्ट्रीज प्लाय बोर्ड इत्यादी समाविष्ट आहे.

बांबूमध्ये जास्त गतीने कार्बन शोषण करून ग्लोबल वॉर्मिंगला ही मात देण्याचे अमर्यादित क्षमता आहे.

या सर्व बाबींचा विचार करून बांबूचा सुचित विकास करणे तसेच बांबूच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग गरीब जनतेच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता करणे व संपूर्ण देशाचा विकास साधण्याकरिता केंद्र शासनाने राष्ट्रीय बांबू मिशन ( National Bamboo Mission )ची स्थापना केली आहे.

बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे त्याकरिता शेतकऱ्यांना उत्तम बांबू रोपाचा पुरवठा होणे आवश्यक आहे, सध्या स्थितीत महाराष्ट्र बाहेरील राज्यांमधून बांबूची टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध होतात.

उत्तम गुणधर्म असलेल्या टिश्यू कल्चर बांबू रोपाचे निर्मिती राज्यांमध्येच करून ती शेतकऱ्यांना शेतात बांधावर, सलग जमिनीवर लागवडीकरीता सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात २८ जून २०१९ रोजी एक शासन निर्णय घेऊन ‘ अटल बांबू समृध्दी योजना ‘ ( atal bamboo samruddhi scheme ) राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

atal bamboo samruddhi scheme योजनेची उदिष्ट

शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करणे, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा जोड देण्यासाठी शेत जमिनीवरील बांबू लागवडीखाली क्षेत्र वाढविणे, बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यास उपजीविकेचे साधन निर्माण करणे व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे अशी या

शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करणे, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा जोड देण्यासाठी शेत जमिनीवरील बांबू लागवडीखाली क्षेत्र वाढविणे, बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यास उपजीविकेचे साधन निर्माण करणे व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे अशी या atal bamboo samruddhi scheme योजनेची उदिष्ट आहेत.

टीश्यु कल्चर रोपाची आवश्यकता

बांबूचे वैशिष्ट्यानुसार बांबूस ज्यावेळी फुलोरा येतो त्यावेळी बामू मृत होतो बांबू फुलोरा हा खालील दोन प्रवृत्ती मध्ये येतो.

१) Sporadic flowering यामध्ये बांबू क्षेत्रातील सलग सर्व बांबूस फुलोरा न येता काही निवड बांबूस ठिकाणी फुलोरा येतो.

२) Gregarious flowering यामध्ये बांबू शेत्रातील सलग सर्व बांबूस फुलोरा येतो.

बांबूचे जीवन चक्र हे 40 ते 100 वर्षे असल्यामुळे त्यांच्या बियाणे वेळेवर उपलब्ध होत नाही. तसेच gregarious flowering येण्यासाठी ठिकाण ही निश्चित ते त्यामुळे या बियापासून होणारे प्रजाती ही व्यावसायिक रित्या तयार करणे शक्य होत नाही.

बांबू बियांची उगवन क्षमता (Germination) ही फार कमी असून त्याची उगवण क्षमता (Viability)फक्त ३ ते ६ महिने असते या अनिश्चिततेमुळे बांबूला कलम तयार करून (Vegetative)बांबू रोपे तयार केली जातात.

उत्तम बांबू रोपे आणि प्रजातीच्या शुद्धी तेची गुणवत्ता टिकवून ठेवणे व मोठ्या प्रमाणात बांबू व रोपांच्या निर्मितीसाठी टिश्यू कल्चर बांबू रोपे तयार करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

टिश्यू कल्चर रोपाकरिता प्रजाती. Bamboo species

  1. Bambusa balcooa
  2. Dendrocalamus brandisii
  3. Bambusa nutan
  4. Dendrocalamus asper
  5. Bambusa tulda

बांबू लागवडीचे फायदे – Profits of Bamboo lagwad

बांबू प्रजातीचे जीवन चक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही. अन्नधान्य तसेच भाजीपाल्याप्रमाणे दरवर्षे बांबू लागवड करण्याची गरज नाही बांबूंचे जीवन चक्र म्हणजेच बांबूला फुलोरा येईपर्यंत बांबू जिवंत असतो.

बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेती सारखे नुकसान होत नाही. बांबूच्या बेटांमध्ये दरवर्षी आठ ते दहा नवीन बांबू तयार होत असतात.

पाणी साचलेल्या पाणथळी जमिनीवर, खरपाड युक्त जमीन, क्षारयुक्त जमीन तसेच मुरमाड जमिनीवर सुद्धा बांबूची लागवड यशस्वीरित्या होऊ शकते, तर पिकांच्या तुलनेत बांबूच्या शेतीवर 30 ते 40 टक्के कमी खर्च येतो.

पहिल्या व दुसऱ्या वर्षीचे बांबू सोडून तिसऱ्या वर्षानंतर बांबू काढता येत असल्यामुळे शाश्वत उत्पन्न मिळवू शकते.

बांबू लागवडीमुळे शेत जमिनीची धूप व जलसंवर्धन या दोन्ही बाबींचा सुद्धा फायदा मिळतो. बांबूच्या कोंबा पासून पानापर्यंत 26 मूल्यवर्धक उत्पादने तयार करण्याची क्षमता बांबूंमध्ये आहे.

उदाहरणार्थ – बांबू कोंबा पासून लोणचे ,भाजी, लाकूड, पडदे, फर्निचर , अगरबत्ती, कापड , ऊर्जा ( Bamboo charcoal )इत्यादी यामुळे बांबूंचा कच्चामाल उपलब्ध होण्याकरता शेतकऱ्यांना शेतामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्यास प्रोत्साहित करणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे व पर्यावरण पूरक आहे.

Bamboo market बाजारपेठ

बांबू पासून उत्पन्न होणारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून मदत केली जाते.

अनुदान

टिशू कल्चर बांबू रोपांचा दर टिशू कल्चर बांबू रोपांचा दर अंदाजे रुपये 25 प्रतिरोप आहे.

शेतकरी प्रथम बांबू रोप खरेदी करून त्यांचे शेत जमिनीवर लागवड करतील अशा जमिनीवर केलेल्या बांबू लागवडीचे तपासणीनंतर बांबू रोपांचे किमती पैकी शासनाकडून 4 हेक्टर किंवा त्याखालील शेती असलेल्या जमीन धारकांना ८०% तर ४ हेक्टर पेक्षा अधिक शेती असलेल्या भूधारकांना ५०% सवलतीच्या दराने सबसिडी त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.

तर उर्वरित बांबू रोपांची किंमत अनुक्रमे 20 व ५० % प्रमाणे खर्च हा शेतकऱ्यांनी हे स्वतः करावयाचा आहे.

atal bamboo samruddhi scheme लाभार्थी निवड

लाभार्थ्याची निवड करण्याकरिता खालील प्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी सवलतीच्या दराने बांबू रोप मिळवण्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात दस्तावेजासह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

  1. शेतीचा गाव नमुना सातबारा 7/12
  2. गाव नमुना ८ गाव 8a
  3. नकाशा ची प्रत
  4. ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपंचायत यांच्याकडून रहिवासी असल्याबाबतचा दाखला
  5. बांबू लागवड करावयाच्या शेतामध्ये बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी ठिबक सिंचन.
  6. बांबू रोपे लहान असताना डुकरापासून रोपे सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण कुंपणाची सोय असल्याबाबतचे हमीपत्र.
  7. आधार कार्ड ची प्रत
  8. बँक खात्याचा तपशील व पासबुकची प्रत कोऱ्या धनादेशाची छायांकित प्रत अर्जदार शेतकऱ्यांचे बँकेचे खाते आधार क्रमांक जोडून घेणे आवश्यक राहील.

शेतामध्ये वीहीर, शेततळे, बोरवेल असल्याबाबतचे विहित प्रपत्रात हमीपत्र,बांबू रोपाची निगा राखणे व संरक्षण कार्य संदर्भात विहित प्रपत्रात हमीपत्र बंधपत्र जिओ टॅग जी आय एस द्वारे फोटो पाठवण्याबाबत हमीपत्र ज्या शेती जमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवड करावयाची हे आहे ते क्षेत्र नकाशावर हिरव्या रंगाने दर्शविणे.

अशा कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.जास्त अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड केली जाते.

atal bamboo samruddhi scheme अंमलबजावणी पद्धत

टिश्यू कल्चर रोपे लागवड ही प्रति हेक्टर 500 रोपे. पाच मीटर x चार मीटर अंतरावर याप्रमाणे 500 बांबू रोपे अधिक २०% मर आळी याप्रमाणे 100 रोपे असे एकूण 600 रुपये प्रति हेक्टर दिली जातात.

चार हेक्टर पेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना एक हेक्टर करिता एकूण ५०० + 20 टक्के वरळी याप्रमाणे 100 असे एकूण 600 बांबू रोपे 80 % सवलतीच्या दराने तसेच चार हेक्टर पेक्षा अधिक शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना एक हेक्टर करिता एकूण 500 + 20% वर आळी याप्रमाणे 100 असे एकूण 600 बांबू रोपे ५०% ( Bamboo lagwad anudan ) सवलतीच्या दराने दिली जातात.

सदर लागवडीचे महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कडून पाहणे करून ती प्रमानीत केल्यानंतर शासनाकडून प्राप्त अर्थसाह्य त्यांचे बँक खाते, पोस्टाचे बचत खात्यामध्ये थेट जमा करण्यात येईल.

उर्वरित बांबू रोपांची किंमत अनुक्रमे 20 टक्के व 50 टक्के ही शेतकऱ्यांनी स्वतः खर्चा करायची आहे.

शेत जमिनीतील मातीचा पोत, सिंचनाची सोय, जवळची बाजारपेठ, स्थानिक पातळीवरील बांबूची असलेले मागणी इत्यादी बाबी विचारात घेऊन बांबू प्रजातीच्या लागवडीबाबत तंत्रज्ञानांकडून मार्गदर्शन केले जाते.

शेतीमध्ये बांबू लागवडीनंतर त्याची निगा राखणे, संरक्षण, पाण्याची मात्रा, खते कीटकनाशकाची फवारणी, आंतरपीक इत्यादी बाबत महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून नियुक्त केलेले सल्लागार तंत्र व वन विभागाचे स्थानिक क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून तांत्रिक मार्गदर्शन केले जाते.

अर्ज करण्यासाठी संकेत स्थळ

MAHARASHTRA FOREST WEBSITE

bambu lagwad yojana या योजनेत प्रति जिल्हा ४ हेक्टर पर्यंतचे ३७५ लाभार्थी तर ४ हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेले ३७५ लाभार्थी अशे लक्षांक देण्यात आलेले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: