Yavatmal antim paisewari जाहीर, खरिपाची अंतिम पैसेवारी 47 पैसे

जिल्ह्याची खरिप पिकांची पैसेवारी ( yavatmal antim paisewari ) 50 पैशाखाली घसरली, अंतिम आणेवारी जाहीर.

Yavatmal antim paisewari

Yavatmal antim paisewari 2022 jahir यवतमाळ जिल्हा खरीप पिकांची 2022 ची अंतिम आणेवारी अंतिम पैसेवारी जाहीर.

राज्यात खरीप हंगामातील पीक परिस्थितीची पाहणी करून पैसेवारी काढली जाते. यामध्ये सुरुवातीला ३० ऑक्टोबरला सुधारित पैसेवारी जाहिर केली गेली होती, मात्र आता शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारी कडे लागले होते.

जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सर्व भागात सारखा पाऊस झाला नाही. पेरण्यांना उशिराने सुरवात झाली. त्यानंतर जून जुलै पावसाचा खंड व शेवटी ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे आता आणेवारी वर काय परिणाम होतोय याकडे सर्वांचे लक्ष होते.

यावर्षीच्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्याने अतिवृष्टीचा सामना केला. तब्बल दहा वेळा विविध मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदविल्या गेली.

यानंतरच्या काळातही पिकांमध्ये पाहिजे तशी सुधारणा झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश पिके हातातून गेली.

जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी अंतिम पैसेवारी जाहीर केली. जिल्ह्याची ही पैसेवारी ४७ टक्क्यांच्या घरात आहे.

यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. प्रारंभी अतिवृष्टीने सोयाबीनचे पीक हातून गेले.

अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगताही आले नाही. सततच्या पावसाने आणि पूरपरिस्थितीने पीक वाहून गेले. तर सततच्या पावसाने शेताचे नुकसान झाले.

शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.

यंदाच्या (२०२२) खरीप हंगामातील ( yavatmal antim paisewari Kharip Season) पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवारी (ता. ३० ) जाहीर करण्यात आली.

त्यानुसार यवतमाळ ( yavatmal antim paisewari / Kharip paisewari ) जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी 47 पैसे दाखविण्यात आली आहे.

सन 2022-23 या वर्षाकरीता तहसिलदार यांच्याकडुन प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी 47 पैसा इतकी जाहिर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

तालुक्यानिहाय हंगामी पैसेवारी

यवतमाळ ४८

कळंब ४६

बाभूळगाव ४६

आर्णी ४५

दारव्हा ४७

दिग्रस ४७

नेर ४६

पुसद ४७

उमरखेड ४७

महागाव ४६

केळापूर ४७

घाटंजी ४७

राळेगाव ४७

वणी ४५

मारेगाव ४६

झरी ४८

असे सरासरी 47 पैस निश्चित करण्यात आली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. नियमित पावसापेक्षा परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे.

यामुळे पैसेवारीही कमी येत आहे. वास्तविक पहाता शेतीचे नुकसान होणे, हा प्रकारच नकारात्मक आहे. यामुळेच पैसेवारी कमी होते, अनुदान व विम्यासाठी ही पैसेवारी योग्य नसल्याचे सांगण्यात येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: