pik vima 2022 धाराशिव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिवाळीपर्यंत 900 कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाई

शेतकर्‍यांना 15 सप्टेंबरपर्यंत नुकसान भरपाई अनुदान, तसेच पीक विमा कंपनीकडून pik vima 2022 25% वीमा मिळेल, असे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

pik vima 2022

pik vima 2022

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिवाळीपर्यंत 900 कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाई

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे शेती पीकांचे अतोनात नुकसान झालेले असून याबाबत पंचनामे झाले असून शेतकर्‍यांना 15 सप्टेंबर पासून नुकसान भरपाई अनुदान, तसेच पीक विमा कंपनी कडूनही नुकसानी पोटी पहिला हप्ता pik vima 2022 25 % वीमा मिळेल, अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

याचबरोबर सन 2021 खरिप हंगामातील पीक विमा नुकसान भरपाईपोटी 330 कोटी रूपये देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी विमा कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई करत आहेत आणि 2020 मधील पीक नुकसान भरपाईपोटी विमा कंपनीने सर्वोच्य न्यायालयात न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जमा केलेले 200 कोटी रूपये थेट शेतकर्‍यांना देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. या प्रकरणी 5 सप्टेंबरला सुनावणी आहे, अशीही माहिती आ. पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यात सन २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे एक लाख 75 हजार हेक्टर वरील पीकांचे नुकसान झाले आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार 33 टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याने नुकसान ग्रहीत धरून विशेष बाब म्हणून राज्य सरकारकडून 15 सप्टेंबरपर्यंत अनुदान शेतकर्‍यांना मिळणार आहे.

तसेच पीक विमा कंपनी कडून खरिप २०२२ मध्ये झालेल्या नुकसान भरपाई पोटी 25 % अग्रीम रक्कम देण्यात येईल. अशी माहिती ही या पत्रकार परिषदेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कडून देण्यात आली आहे.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत 7 टीएमसी पेक्षा अधिक पाणी मिळावे यासाठी संबंधितांची बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याचे सांगून 7 टीएमसी पाणी कामावरील बंदी उठवली असून डिसेंबर २०२२ पर्यंत हे पाणी धाराशिव जिल्ह्याला मिळेल, असेही ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: