Osmanabad Kharip paisewari 47 पर्यंत, नुकसान भरपाईस अनुकूलता

सन २०२२ मध्येही अपेक्षेप्रमाणे खरिप पिकांची पैसेवारी ( Osmanabad Kharip paisewari ) ४७.८७ पर्यंत घसरली, धाराशिव ची सुधारित खरिप पैसेवारी जाहीर. शेतकऱ्यांना पीकविमा, नुकसान भरपाई मिळण्यास अनुकूलता.

Osmanabad Kharip paisewari

Osmanabad Kharip paisewari 2022 Sudharit

राज्यात खरीप हंगामातील पीक परिस्थितीची पाहणी करून पैसेवारी काढली जाते. यामध्ये सुरुवातीला १५ ऑक्टोबरला हंगामी पैसेवारी जाहिर केली गेली आहे, आता शेतकऱ्यांचे लक्ष सुधारित पैसेवारी कडे लागले होते.

खरीप पिकांची सुधारीत पैसेवारी ३१ ऑक्टोबरला जाहिर करण्याची पद्धत आहे, त्यानुसार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ( kharip paisevari 2022 ) जाहिर केली आहे.

या सुधारित पासिवरी नुसार उस्मानाबाद जिल्ह्याची पैसेवारी ही ४७.८७ पैसे पर्यंत घसरल्याचे निदर्शनास आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची सरासरी पैसेवारी ( Osmanabad Kharip paisewari ) ही ५० पैशाच्या च्या आत आहे.

यामध्ये उस्मानाबाद तालुका ४८, तुळजापूर ४८.४९, उमरगा ४८.४९, लोहारा ४८.०१, भूम ४७, परंडा ४७, कळंब ४८ व वाशी तालुक्याचीही पैसेवारी ४८ आली आहे.

२०२२ मध्ये अतिवृष्टी मुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरिपातील पिकांची नासाडी झाली, सुरुवातीला पावसाचा खंड त्यामुळे उशिरा झालेल्या पेरण्या, सुरुवातीच्या टप्प्यात गोगलगाईचा प्रादुर्भाव, नंतर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव, सततचा पाऊस यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

यावर्षी जिल्ह्यात साेयाबीनचाच पेरा अधिक झाला होता. लागोपाठ आलेल्या संकटांमुळे सोयाबीन हातचे गेले आहे. जिल्ह्यात एका पिशवीला किमान १० क्विंटल उत्पन्न होणे अपेक्षित आहे. आता केवळ ३ क्विंटलच उत्पन्न हाती लागले आहे. यामुळे यावेळी पैसेवारी किमान ५० च्या आत येणे अपेक्षित होते. त्यानुसार पैसेवारी जाहिर करण्यात आल्यामुळे आता शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी कोणतेही अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.

आता उस्मानाबाद जिल्ह्याची पैसेवारी ( Osmanabad Kharip paisewari ) ५० टक्क्यांच्या आत आल्याने सर्व बाबींचा लाभ मिळण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.

गेल्या तीन वर्षांपासून शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. नियमित पावसापेक्षा परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे.

यामुळे पैसेवारीही कमी येत आहे. वास्तविक पहाता शेतीचे नुकसान होणे, हा प्रकारच नकारात्मक आहे. यामुळेच पैसेवारी कमी होते. परंतु, अनुदान व विम्यासाठी ही पैसेवारी योग्य असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: