केंद्र शासनाने मनरेगा च्या जागेवर आणलेल्या विकसित भारत जी राम जी कायदा, 2025 ( VB-G RAMG) ची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे होणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

VB-G RAMG 2026
राज्यात केंद्र पुरस्कृत विकसित भारत – जी राम जी (VB-G RAMG) योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विकसित भारत – जी राम जी कायदा, २०२५ या कायद्याशी सुसंगत अशा तरतुदी करण्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, शाश्वत उपजीविका संधींचा विस्तार तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार असून विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
या सुधारामुळे केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (https://www.prabhudevalg.com/2026/02/mantrimandal-baithak-2026.htmlग्रामीण) अर्थात ‘विकसित भारत-जी राम जी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता येणार आहे. त्यासाठी विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) कायदा, २०२५ मधील कलम ३० नुसार महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ मध्ये सुसंगत सुधारणा करण्यात येणार आहे.
लवकरच अध्यादेश निर्गमित करून राज्यात १ जुलैपासून ही योजना लागू केली जाईल.


