पावसाचा खंड, ही मंडळ पिकविम्यासाठी पात्र | Parbhani Pik vima 2022

पावसाच्या खंडा मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा, परभणी जिल्हा ( Parbhani Pik vima ) अधिसूचना निर्गमित.

Parbhani pik vima

Parbhani pik vima update 2022

राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी, तर काही भागात पावसाचा खंड पडला होता. यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

परभणी जिल्हयात ही अशीच काही परिस्थिती निर्माण झाली होती, जुलै च्या पावसानंतर ऑगस्ट महिन्यात २१ दिवस पावसाचा खंड पडला. त्यामुळे सोयाबीनच्या संभाव्य नुकसान भरपाई साठी प्रधानमंत्री पीक योजनेच्या निकषानुसार जिल्हाधिाऱ्यांमार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

या अधिसूचनेनुसार नुकसान ग्रस्त पात्र मंडळातील शेतकऱ्यांना मंजूर रकमेच्या २५% रक्कम पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी आयसीआयसीआय लोबार्ड जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला आदेशित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना दिली जाणारी २५% रक्कम अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत ( prabhani pik vima )शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी विमा कंपनीला दिले आहेत.

या अधिसूचनेनुसार परभणी जिल्ह्यातील एकूण 52 महसूल मंडळ पैकी फक्त आठ मंडळातील शेतकऱ्यांना प्रधान पीक विमा योजना अंतर्गत 25% अग्रिम रक्कम मिळणार आहे.

सतत 21 दिवस पावसाचा खंड झाल्याने परभणी जिल्ह्यातील आठ मंडळात 52 ते 57 % पर्यंत सरासरी उत्पादनाच्या तुलनेत घट आली आहे.

यामध्ये परभणी तालुक्यातील झरी, शिंगणापूर, जांब तर गंगाखेड तालुक्यातील माखणी, पूर्णा तालुक्यातील चुडावा, मानवत तालुक्यातील रामपुरी, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ, तर जिंतूर तालुक्यातील दुधगाव या महसूल मंडळाचा समावेश आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जिल्ह्यात सहा तालुक्यांतील आठ मंडळात 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास कंपनीकडून सुरुवात झाली आहे.

खरीप हंगाम 2022 ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात 26 दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी 6 सप्टेंबरला शासकीय अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधींना सोयाबीनच्या नुकसानीसंदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार या मंडळातील मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनात 50 टक्क्यापेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील तीन मंडळांचा समावेश आहे.

पीक विमा योजनेतील प्रतिकूल परिस्थिती मुळे झालेले नुकसान या जोखीम बाबीअंतर्गंत या आठ मंडळातील शेतकऱ्यांना संभाव्य विमा भरपाईपैकी 25 टक्के अग्रीम रक्कम महिन्याभरात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डं जनरल विमा कंपनीला 9 सप्टेंबर रोजी दिले होते.

त्यानुसार या आठ मंडळातील सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या सर्व 73 हजार 814 शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमाभरपाई महसूल मंडळनिहाय मंजूर करण्यात आली. यासाठी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धिरज कुमार, संचालक विस्तार विकास पाटील व मुख्य सांख्यिकी विनय आवटे यांचे मार्गदर्शन लाभले.

गंगाखेड तालुक्यातील माखणी मंडळातील 13,626 शेतकऱ्यांना 6697 प्रति हेक्टरीप्रमाणे 5.26 कोटी, जिंतूर तालुक्यातील दुधगाव मंडळातील 9,184 शेतकऱ्यांना 6,421 प्रमाणे 5.16 कोटी, मानवत तालुक्यातील रामपुरी मंडळातील 6,063 शेतकऱ्यांना 6248 प्रति हेक्टरीप्रमाणे 3.99 कोटी, परभणी तालुक्यातील जांब मंडळातील 10,953 शेतकऱ्यांना 6392 प्रतिहेक्टरी प्रमाणे 6.40 कोटी, परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळातील 8,063 शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6,363 प्रमाणे 4.80 कोटी, झरी मंडळातील 10,537 शेतकऱ्यांना 6,193 प्रतिहेक्टरी याप्रमाणे 6.01 कोटी, पुर्णा तालुक्यातील चुडावा मंडळातील 8,778 शेतकऱ्यांना 7,018 प्रतिहेक्टरीप्रमाणे 4.31 कोटी रुपये सोनपेठ मंडळातील 6,005 शेतकऱ्यांना 6,763.85 प्रतिहेक्टरी प्रमाणे 4.16 कोटी रुपयांची विमा भरपाई देण्यात येत असून 73 हजार 814 शेतकऱ्यांच्या खात्यावर 40.71 कोटी रुपये जमा होत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: