गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कागदपत्रे, अर्ज नमुना | Gopinath munde shetkari apghat vima yojana 2022

जाणून घेऊयात काय आहे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ( Gopinath munde shetkari apghat vima yojana 2022 ). काय कागतात कागदपत्रे, अर्ज नमुना pdf, सविस्तर 

Gopinath munde shetkari apghat vima yojana 2022 उद्दिष्टय

अपघातामुळे शेतकऱ्यांचे होणारे मृत्यू , येणार अपंगत्व यातून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शेतकरी अपघात विमा हि योजना ( shetkari apghat vima yojana ) हि  योजना २००५-०६ पासून सुरु करण्यात आलेली योजना आहे.

शेती व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू ओढवतो किंवा कायम स्वरूपीअपंगत्व येत अश्या अशा परिस्थिती शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते, अशा वेळी त्या शेतकऱ्याला अथवा त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला सावरन्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी हि योजना राबवली जात आहे.

संकट समयी अपघात ग्रस्त गरीब शेतकरी कुटुंबाला शासनाकडून मदतीचा हात देणं  हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्टय आहे.

गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना Gopinath munde shetkari apghat vima yojana

शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो त्याची करणे वेगवेगळी असू शकतात . जसे कि अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती , पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. अशा अकाली झालेल्या मृत्यूमुळे शेतकरी कुटुंबाचा आधार जातो. 

सन २००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता परंतु ह्या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्षात घेता सन २०१५-१६ मध्ये हि रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली.  व या नव्या स्वरूपातील  योजनेला  ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजना’ ( Gopinath munde shetkari apghat vima yojana ) असे नाव देण्यात आले.

या योजनेकरिता राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात येत असून या सर्व वहितीधारक शेतकऱ्यांचा दोन लाख रुपयांचा विमा या योजनेअंतर्गत उतरविण्यात येत आहे.

गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना लाभार्थी पात्रता

या योजनेअंतर्गत लाभ हा 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्याला मिळणार आहे. यापुर्वी या योजनेत ज्याचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचा सातबारा असणे आवश्यक होते. मात्र, यामध्ये बदल करुन जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे शेतजमिन असली तरी सहभागी होता येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई,वडिल, शेतकर्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन जण या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असतील. 

गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना मिळणारे लाभ

अपघाती मृत्यूनुकसान भर्पाइची रक्कम रु.2 लाख.

अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.2 लाख

अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.1 लाख.

गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना विमा हप्ता

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणताही विमा हप्ता भरावा लागत नाही. सर्व शेतकरी यांची विमा हप्त्याची रक्कम (प्रती शेतकरी रु.32.23 रु)  शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. त्यामुळे शेतकरी यांनी विमा हप्ता भरण्याची गरज नाही.

विमा पॉलिसी कालावधी

10.12.2021 ते 9.12.2022

गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्र

  1. शेतकऱ्याच्या जमिनीचा ७/१२ ( वहितीधारक नसेल तर कुटुंबातील सदस्याचा )
  2. ६क ची नकल 
  3. ६ड (फेरफार ferfar )
  4. एफ. आय. आर. ( FIR COPY )
  5. पंचनामा
  6. पोष्ट मार्टेम रिपोर्ट
  7. व्हिसेरा रिपोर्ट
  8. दोषारोप
  9. दावा अर्ज
  10. वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक
  11. घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब (अर्जदाराच्या फोटोसह) १३)वयाचा दाखला
  12. तालुका कृषि अधिकार पत्र
  13. अकस्मात मृत्यूची खबर
  14. घटनास्थळ पंचनामा
  15. इंनक्वेस्ट पंचनामा
  16. वाहन चालविण्याचा वैध परवाना
  17. अपंगत्वाचा दाखला व फोटो
  18. औषधोपचारा चेकागदपत्र
  19. अपघात नोंदणी ४५ दिवसाचे आत करणे

* कागदपत्र अपघाताच्या स्वरूपानुसार वेगवेगळी असतात.

गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी अर्ज

अर्ज कुठे करावा – तालुका कृषी अधिकारी कार्यालय.

अर्ज नमुना pdf

विमा दाव्याच्या अनुषंगाने पुर्व सुचना अर्ज विहित कागद पत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल/प्राप्त होइल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होइल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येइल.

विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेअंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.

शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पुर्व सुचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांचे कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसी चा कालावधी संपल्याच्या  दिवसापासून 365 दिवसां पर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.

मात्र सदर कालावधी नंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय/आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: