नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 257 कोटीचा पीकविमा | dharashiv pikvima 2022

Dharashiv pikvima 2022 – धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी, गोगल गाई मुळे झालेले नुकसान ई नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई पोटी ₹२५७ कोटी.

dharashiv pikvima 2022

dharashiv pikvima 2022 manjur

धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२२ ( kharip pikvima 2022 ) पिक विम्यापोटी पहिल्या टप्प्याचे २४१ कोटी रुपये नोव्हेंबर मध्येच वितरित होणार !

जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, गोगलगाय, येलोमोझॅकच्या प्रादुर्भावाने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादकतेमध्ये मोठी घट निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानी करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा कंपनी कडे दावा दाखल केले आहेत.

नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या सर्व शेतकऱ्यांची पंचनाम्यासह इतर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात २५७ कोटी रुपये वितरित करण्यात येत आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानी प्रमाणे अनुज्ञेय पिक विमा वितरित केला जाणार आहे.

धाराशिव जिल्ह्यात एकूण ५ लाख ४९,००० तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

यापैकी ३ लाख १३, ८९४ दावे मंजूर करण्यात आले असून त्यासाठी २५७ कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

तर ९०,८९९ दावे मंजूर असून लवकरच यासाठी ची रक्कम निश्चित केली जाईल व दुसऱ्या टप्प्यात या रक्कमेच वितरण केलं जाईल.

याचबरोबर जिल्ह्यातील ९२१२२ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत.

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नुकसानीचे क्षेत्र व तीव्रता जास्त असल्याने २५% अग्रीम देण्याची मागणी केली होती. त्यासाठी देखील १०४ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे, त्यांना पूर्ण रक्कम देण्यात येत असून पडताळणी करून आवश्यकते प्रमाणे शेतकऱ्यांना अग्रीमची रक्कम देखील देण्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: