Dharashiv pikvima 2022 – धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी, गोगल गाई मुळे झालेले नुकसान ई नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई पोटी ₹२५७ कोटी.

dharashiv pikvima 2022 manjur
धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२२ ( kharip pikvima 2022 ) पिक विम्यापोटी पहिल्या टप्प्याचे २४१ कोटी रुपये नोव्हेंबर मध्येच वितरित होणार !
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानी करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा कंपनी कडे दावा दाखल केले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात एकूण ५ लाख ४९,००० तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
यापैकी ३ लाख १३, ८९४ दावे मंजूर करण्यात आले असून त्यासाठी २५७ कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
तर ९०,८९९ दावे मंजूर असून लवकरच यासाठी ची रक्कम निश्चित केली जाईल व दुसऱ्या टप्प्यात या रक्कमेच वितरण केलं जाईल.
याचबरोबर जिल्ह्यातील ९२१२२ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत.
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नुकसानीचे क्षेत्र व तीव्रता जास्त असल्याने २५% अग्रीम देण्याची मागणी केली होती. त्यासाठी देखील १०४ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे, त्यांना पूर्ण रक्कम देण्यात येत असून पडताळणी करून आवश्यकते प्रमाणे शेतकऱ्यांना अग्रीमची रक्कम देखील देण्यात येईल.