antim paisewari 48 पैसे, जिल्ह्याच्या दुष्काळावर शिक्कामोर्तब

संभाजीनगर जिल्ह्याची खरिप पिकांची पैसेवारी ( antim paisewari ) 48 पैशावर, जिल्ह्याच्या दुष्काळावर शिक्का मोर्तब; शेतकऱ्यांची शासनाच्या मदती कडे नजर.

antim paisewari

antim paisewari 2022 jahir संभाजीनगर जिल्हा खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे

राज्यात खरीप हंगामातील पीक परिस्थितीची पाहणी करून पैसेवारी काढली जाते. यामध्ये सुरुवातीला ३० ऑक्टोबरला सुधारित पैसेवारी जाहिर केली गेली होती, मात्र आता शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारी कडे लागले होते.

जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सर्व भागात सारखा पाऊस झाला नाही. पेरण्यांना उशिराने सुरवात झाली. त्यानंतर जून ते ऑगस्ट व शेवटी ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे आता आणेवारी वर काय परिणाम होतोय याकडे सर्वांचे लक्ष होते.

यानंतरच्या काळातही पिकांमध्ये पाहिजे तशी सुधारणा झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश पिके हातातून गेली.

जिल्हा प्रशासनाने antim paisewari पैसेवारी जाहीर केली यामुळे जिल्ह्याच्या दुष्काळ सदृश्य स्थितीवर शिक्का मोर्तब झाला आहे.

संभाजीनगर जिल्ह्यात एकूण १ हजार ३८५ पैकी १ हजार २२४ गावे खरीप तर १६१ रब्बी गावे आहेत यातील खरीप व रब्बीचे मिळून १ हजार ३५६ गावांची पैसेवारी काढण्यात आली तर २९ गाव उजाड गावं म्हणून नोंदवली गेली आहेत.

जिल्ह्यातील खरिपांच्या १ हजार १९५ तर रब्बीच्या १६१ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आली आहे.अशी माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली.

तालुका निहाय अंतिम पैसेवारी antim paisewari

औरंगाबाद ४८.४२ पैसे

पैठण ४८.०० पैसे

फुलंबी ४८.०० पैसे

वैजापूर ४५.०० पैसे

गंगापूर ४८.७२ पैसे

खुलताबाद ४७.०८ पैसे

सिलोड ४८.०० पैसे

कन्नड ४९.०० पैसे

सोयगाव ४८.०० पैसे

संभाजीनगर जिल्हा एकूण ४७.८६ पैसे

संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच नऊ तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर झाल्याचा अहवाल प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला.

यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. प्रारंभी अतिवृष्टीने सोयाबीनचे पीक हातून गेले.

अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगताही आले नाही. सततच्या पावसाने आणि पूरपरिस्थितीने पीक वाहून गेले. तर सततच्या पावसाने शेताचे नुकसान झाले.

शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते.

यामुळे पैसेवारीही कमी येत आहे. वास्तविक पहाता शेतीचे नुकसान होणे, हा प्रकारच नकारात्मक आहे. यामुळेच पैसेवारी कमी होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: